*सप्ताहातून नवचैतन्याची अनुभूती – नीलम खताळ* _गगनगिरी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला_
*सप्ताहातून नवचैतन्याची अनुभूती – नीलम खताळ*
_गगनगिरी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला_
संगमनेर ( प्रतिनिधी )
गेली काही महिन्यांपासून ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, त्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभामुळे संगमनेर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. महाराजांच्या कृपेने संगमनेरवासीयांना दिव्य दर्शनाचा लाभ मिळणार असून वातावरण पवित्र, प्रसन्न आणि ऊर्जामय होणार आहे. सप्ताहासारख्या महान कार्यातून ज्येष्ठांकडून संस्कार, अध्यात्म आणि जीवनमूल्यांचे शिक्षण मिळते. नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचे काम अशा धार्मिक उपक्रमांतून घडते असे प्रतिपादन नीलम खताळ यांनी केले.
गुंजाळवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी खताळ बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की, देव आपल्या दारात आला आहे, त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी. देवादिकांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासामुळे खताळ कुटुंबाला लोकसेवेची संधी मिळाली आहे. जनतेने दिलेल्या या विश्वासाचे सोने करून परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. सप्ताह हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सर्व समाजासाठी खुले व्यासपीठ आहे. या सप्ताहामुळे तालुक्यात भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडत असून प्रत्येकाने या आध्यात्मिक पर्वाचा आनंद घ्यावा असे आवाहनही नीलम खताळ त्यांनी केले.




