क्राईम

महाराष्ट्राचा उद्योग रत्न, भारताचे सुपुत्र अनंताच्या प्रवासाला..; राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, महाराष्ट्राने अर्पण केली श्रद्धांजली


महाराष्ट्राचा उद्योग रत्न, भारताचे सुपुत्र अनंताच्या प्रवासाला..;

राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, महाराष्ट्राने अर्पण केली श्रद्धांजली

 

 

मुंबई:प्रतिनिधी

टाटा उद्योग समूहाचे सर्व आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (९ ऑक्टोंबर) निधन झाले. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला, अशी प्रतिक्रिया सध्या सर्वत्र उमटताना दिसत आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

 

रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुःखाचा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा अशोक प्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

 

या शोक प्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशील हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगाच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजा प्रति तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, देशप्रेमी मार्गदर्शक गमावला.

 

भारताच्या उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातील श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताच्या अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठ मोठे उद्योग सांभाळताना पडलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री.टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचा ठसा उमटवला. त्यांच्या रूपाने देशाचे प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

 

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पंतू होते. टाटा समूहाच्या अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरीमाध्यक्ष म्हणून या समूहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समूहाच्या चॅरीटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी कृतीने त्यांनी काम पाहिलं.

Advertisement

 

टाटा यांनी नैतिक मूल्याची जपवणूक केली, ती इतकी उद्योजकांसाठी आणि उद्योग विश्वासाची भावी पिढीसाठी दीपस्तंभ सारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणी टाटा समूहाच्या सिंहाचा वाटा होता. या समूहाचा माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून विटा पर्यंत आणि कॅम्पुटर पासून कॉफीचा पर्यंत असंख्य उत्पन्नाशी टाटा हे नाव अभिमाने जोडले जाते.

 

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील रतन टाटा यांनी आपले अनन्य साधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएफ रिलीफ फंडाला तात्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिले. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणार आहे.

 

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या टाटा मूल्याशी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तुत्वाला, प्रयोगशीलतेला प्रोस्थान देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात तरुणाच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केले.

 

महाराष्ट्राच्या सरकारचा पहिला’उद्योग रत्न’हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचा भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला भाग्य लाभलं. रतन टाटा यांच्या निर्णयाने आपला देश आणि महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारी नुकसान झाले. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे त्यांच्या आत्म्याला सदभावना लाभो ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *