मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात सत्ताधारी व विरोधकांनी तात्काळ निर्णय घ्यावा; अन्यथा नाशिक जिल्हा बंदीसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात सत्ताधारी व विरोधकांनी तात्काळ निर्णय घ्यावा;
अन्यथा नाशिक जिल्हा बंदीसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
नाशिक प्रतिनिधी
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने व विरोधकांनी एकत्रित पुढाकार घेऊन त्वरित सोडविवावे असे आवाहन करणारे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,सकल मराठा समाजाच्या वतीने आपणास विनंती करत आहोत की,गरजवंत मराठ्यांच्या 50%च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत आहेत.आता पर्यंत मनोज जरांगे पाटलांनी सहा वेळा आमरण उपोषण केले आहे.मनोज जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सकल मराठा समाजाची परीक्षा न पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
1)सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. 2)हैदराबाद गॅझेट लागू करावे,सातारा गॅझेट लागू करावे.बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे.
3)संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
4)कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
5) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे.
6) EWS सह SEBC किंवा कुणबी OBC हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा.
7)मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा.
Advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा आणि विशेष अधिवेशन बोलवून मागण्या मान्य कराव्यात.विशेष अधिवेशन live करण्यात यावे जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका सकल मराठा समाजाला कळेल,आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकारण कोण करत आहे हे महाराष्ट्राला कळेल, वरील विषय मार्गी लावले तर अखंड मराठा समाज तुमचे ऋण कधीही विसरणार नाही.विरोधकांपेक्षा सत्तेवर आल्यावर तुम्ही मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारखे विविध संस्थाच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास घडून येण्यासाठी प्रयत्न केला.आज रोजी सकल मराठा समाजाला न्यायालयीन कक्षात टिकणारे आरक्षण मिळणे खूप गरजेचे आहे.आपण तिघांनी पुढाकार घेतला तर हे टिकणारे 50% च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकते.संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी सरकारने काहीही हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नाहीत.तरी शासन म्हणून आपण त्वरित विशेष अधिवेशन बोलवावे.त्यांच्या तब्बेतीचा विचार करता त्यांना उपोषणापासून फक्त सरकार मागण्या मान्य करून थांबवू शकते.सकल मराठा समाज नाशिक जिल्हा आपणांस कळकळीची विनंती करत आहे की मागण्या आणि आरक्षण देऊन आपण हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकालात काढावा.अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको,रेल्वे रोको,सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गाव बंदी,नेत्यांना घेराव,शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन,मराठा समाजातील मुले शाळा,कॉलेज वरती बहिष्कार टाकतील,तसेच मंत्रालयावर घंटा नाद पायी यात्रा काढण्यात येणार व जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल.
उपजिल्हाधिकारी दराडे यांना निवेदन देताना सकल मराठा समाजाचे नानासाहेब बच्छाव,करण गायकर, नितीन रोटे पाटील,संजय फोटोळ डॉ. किरण डोखे,त्रिलोक भामरे,राम निकम,दत्ता कवडे,राजेंद्र शेळके, वैभव दळवी,सुरज मालुंजकर,गौरव गाजरे,प्रितेश रायते,विक्रम गायधनी, अनिल आहेर,रोहिणी उखाडे,वंदना पाटील,सुमन महाले,ऍड स्वप्न राऊत, स्वाती जाधव,अण्णा पिंपळे,विलास रसाळ,ज्ञानेश्वर सुरासे,विकास रसाळ, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.