ताज्या घडामोडीसामाजिक

नामचंद पवळा यांनी कला क्षेत्रातील कलाक्षेत्रातील एक क्रांतीकार पर्व -प्रा. भगवान अहिरे आद्यनृत्यांगना नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत


नामचंद पवळा यांनी कला क्षेत्रातील कलाक्षेत्रातील एक क्रांतीकार पर्व -प्रा. भगवान अहिरे

 

आद्यनृत्यांगना नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

 

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

 

अहमदनगर (प्रतिनिधी)-

एकोणिसाव्या शतकातील स्त्रीया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या. त्या काळात आद्यनृत्यांगना नामचंद पवळा हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर सर्वत्र लावण्या सादर केल्या. लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे नामचंद पवळा यांना क्रांतीकारक म्हणणे उचित ठरेल.

महिलांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला. कलाकाराला पाहण्यासाठी तिकीट असणे, ही इतिहासात नोंद घेणारी घटना आहे. नामचंद पवळा या अद्वितीय व्यक्तिमत्व होत्या, असे प्रतिपादन तमाशा व लोककला अभ्यासक तथा संशोधक प्रा. भगवान अहिरे यांनी केले.

 

 

आद्यनृत्यांगना नामचंद पवळा हिवरगावकर यांची 154 वी जयंती कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजश्री शाहू विचार मंच हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रा. अहिरे बोलत होते.

 

सरपंच सुभाष गडाख म्हणाले,नामचंद पवळा यांनी हिवरगाव पावसा गावाचे नाव देश पातळीवर उंचावले आहे.त्यांच्या राष्ट्रीय स्मारका प्रश्नी ग्रामपंचायत हिवरगाव पावसा संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे.कला सम्राज्ञी पवळा कलामंच संस्थेच्या मार्फत राज्यस्तरीय नृत्यस्पर्धांचे आयोजन केले जावे. नृत्यस्पर्धेच्या माध्यमातून गुणवंत कलावंत निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यांनी नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी मिळवण्याकरिता संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

 

वृक्ष मित्र प्रा. गणपत पावसे म्हणाले की, नामचंद पवळा यांनी कलाक्षेत्रात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्याचे कार्य कला सम्राज्ञी पवळा कलामंच मार्फत केले जात आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.कला सम्राज्ञी पवळा कलामंच संस्थेच्या मार्फत गावात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे म्हणाले की,तमाशा कलेची पंढरी हिवरगाव पावसा आहे.कारण सन १२ ऑगस्ट १८८७ नामचंद पवळा यांचा जन्म विठाबाई नारायणगावकर यांच्या आधीचा आहे.महिला कला क्षेत्रात काम करत नव्हत्या अशा कालखंडात नामचंद पवळा हिवारगावकर यांनी तमाशा क्षेत्रात मोठ्या धाडसाने पूल टाकले आणि त्यांनी एक इतिहास घडविला त्यामुळे तमाशा कलेची पंढरी हिवरगाव पावसा आहे असे म्हणणे योग्य ठरेल.

संस्थेचे सचिव पवळा भालेराव यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव म्हणाले की, नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी हिवरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्रमक लढा दिला जाणार आहे. त्यांचे नात भाचे दिवंगत चांगदेव लहुजी भालेराव यांनी भव्य स्वरूपाच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. सदर प्रस्ताव 1 जानेवारी 2020 रोजी राज्य शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. मात्र हा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून, त्याला गती दिली जाणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कला सम्राज्ञी पवळा कलामंच हिवरगाव पावसा ता.संगमनेरजि.अ.नगर या संस्थेच्या वतीने तमाशा कलावंत व इतर लोककलावंतांची डिजिटल नोंदणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्राची संस्कृती अनेक लोककला प्रकार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.असंख्य लोककलावंतांची कोठेही नोंद नाही.त्यामुळे त्यांना ना मानधन मिळते, ना शासकीय मदत मिळते. अनेक लोककलावंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगात आहे.कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या मार्फत लोककला जतन व संवर्धना बरोबर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कलावंतांची डिजिटल नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भीम शाहीर मधुकर भालेराव यांचा भीम गीतांचा कार्यक्रमास उस्पुर्त प्रतिसाद मिळाला.या कार्याक्रमास प्रा.र.रा.भालेराव, शिवसेना तालुका उपप्रमुख ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, रामनाथ गडाख,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक विलास कदम, सामाजिक कार्यकर्त्या शैला भालेराव,सीताराम गडाख गुरुजी, संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव,यादव भालेराव,यांच्या सह बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला तसेच ग्रामस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

   तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत भालेराव, रोहिणी भालेराव, विजय निळे, राजेंद्र दारोळ विकास दारोळे, सुयोग भालेराव,बाबासाहेब कदम, बाळासाहेब भालेराव,बच्चन भालेराव,लहानू भालेराव,मन्सूर इनामदार,पल्लवी भालेराव, सुमित पावसे,आदींनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *