*एस टी ला पावला पांडुरंग* *आषाढी यात्रेनिमित्त ९ लाखांहून अधिक विठ्ठलभक्तांनी केला एसटीने प्रवास* महामंडळाला मिळाले तब्बल ‘२९ कोटींचे’ उत्पन्न *नाशिक /किरण घायदार*
*एस टी ला पावला पांडुरंग*
*आषाढी यात्रेनिमित्त ९ लाखांहून अधिक विठ्ठलभक्तांनी केला एसटीने प्रवास*
महामंडळाला मिळाले तब्बल ‘२९ कोटींचे’ उत्पन्न*नाशिक /किरण घायदार*
Advertisement
यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसद्वारे १ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाख रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल असा विश्वास एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे.